Khabar Cinema

२७ गावांच्या समस्यांवर लक्ष देण्याची मागणी ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली दखल

कल्याण डोंबिवली मधील २७ गावांचा पाणी प्रश्न उप मुख्यमंत्र्यांच्या दरबारी
मा.अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी घेतली अजित दादांची भेट
   
              कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या सत्तावीस गावांमध्ये सध्या पाणी ,कचरा ,रस्ते यांच्या समस्या गंभीर निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे मा. स्थायी समिती सदस्य तथा अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेऊन २७ गावांच्या समस्या उपमुख्यमंत्र्यांच्या दरबारी मांडल्या आहेत.
       कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या २७ गावांमधील मधील नागरिकांना फक्त आश्वासने देण्यात आली मात्र आश्‍वासनांची पूर्तता अजून झाली नसल्याने नागरिक देखील संतापले आहेत. सध्या उन्हाळा सुरू आहे. आणि नागरिकांना प्रचंड पाणी कचरा आणि नादुरुस्त असलेल्या रस्त्यांच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे मा. नगरसेवक कुणाल पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन २७ गावांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी देखील कुणाल पाटील यांचे समस्या जाणून घेत वकरच या संबंधी सर्व अधिकार्‍यांची बैठक घेत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.